श्री लक्ष्मी आई यात्रोत्सव समितीने कीर्तन महोत्सव घेऊन आदर्श निर्माण केला -विवेकभैय्या कोल्हे
संपादक:- रविंद्र जगताप
कोपरगाव : प्रत्येक गावचे एक ग्रामदैवत असते. गावची यात्रा म्हणजे गावाचे वैभव असते. श्री लक्ष्मी आई हे कोपरगावचे ग्रामदैवत आहे. श्री लक्ष्मी आई यात्रेनिमित्त यावर्षी यात्रा उत्सव समितीने कीर्तन महोत्सवाचे आयोजन करून अनेक नामवंत कीर्तनकारांचे कार्यक्रम घेतले. त्यातून समाजप्रबोधन केले. हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून, यात्रा महोत्सव कशा पद्धतीने साजरा केला पाहिजे याचा आदर्श कोपरगाव येथील श्री लक्ष्मी आई यात्रा उत्सव समितीने घालून दिला आहे, असे कौतुकोद्गार सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी काढले.
कोपरगावचे ग्रामदैवत श्री लक्ष्मी आई माता यात्रोत्सवानिमित युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी बुधवारी (१९ एप्रिल) रात्री श्री लक्ष्मी आईच्या चरणी नतमस्तक होऊन मनोभावे दर्शन घेतले. महाआरती केली. त्यानंतर श्री लक्ष्मी आई यात्रा उत्सव समितीच्या वतीने शहरातील बाजार तळ येथे आयोजित कीर्तन महोत्सवास भेट देऊन ह.भ.प. किशोर महाराज खरात (श्रीक्षेत्र आळंदी) यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा लाभ घेतला. तसेच भाविकांना महाप्रसाद वाटपाची सेवा केली.


यावेळी विवेकभैय्या कोल्हे म्हणाले, कोपरगाव ही ऐतिहासिक भूमी आहे. कोपरगाव शहर व परिसराला फार मोठा धार्मिक, पौराणिक वारसा लाभला आहे. अनेक संत, महात्म्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे. कोपरगाव शहर व तालुक्यात अनेक धार्मिक स्थळे आहेत. कोपरगाव येथील श्री लक्ष्मी आई हे एक जागृत देवस्थान आहे. अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. अनेक वर्षांपासून श्री लक्ष्मी आई यात्रोत्सव भक्तिभावाने उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री लक्ष्मी आई यात्रोत्सव विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येत आहे. यात्रेच्या निमित्ताने धार्मिक कार्यक्रमांबरोबरच समाजोपयोगी तसेच समाजप्रबोधनाचे कार्यक्रम घेतले पाहिजेत. यावर्षी श्री लक्ष्मी आई यात्रेनिमित्त यात्रा उत्सव समितीने कीर्तन महोत्सवाचे आयोजन करून भरकटत चाललेल्या युवा पिढीला नवी दिशा देऊन युवकांमध्ये अध्यात्माविषयी गोडी निर्माण करण्याचे व समाजप्रबोधनाचे अत्यंत चांगले काम केले आहे. याबद्दल विवेकभैय्या कोल्हे यांनी यात्रा उत्सव समितीचे अभिनंदन करून सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद दिले. विवेकभैय्यांनी श्री लक्ष्मी आई यात्रोत्सवानिमित्त सर्व भाविक-भक्तांना शुभेच्छा देऊन सर्वांना अस्मानी संकटावर यशस्वीपणे मात करण्याची शक्ती देवो, नवीन वर्ष सुख-समृद्धीचे, भरभराटीचे व आरोग्यदायी जावो, अशी प्रार्थना श्री लक्ष्मी आईच्या चरणी केली.
श्री लक्ष्मी आई यात्रा उत्सव समिती समितीतर्फे विवेकभैय्या कोल्हे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, सौ. ऐश्वर्याताई सातभाई, अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे संचालक गोपीनाथ गायकवाड, भाजपचे शहराध्यक्ष दत्ता काले, समता पतसंस्थेचे संचालक कांतीलाल जोशी, साहेबराव आढाव, विकास आढाव, कैलास नागरे, महेश मते, राहुल शिंदे, शिवकिरण आमले, दत्तात्रय पेटकर, रमेश गवळी, गणेश कानडे, वैभव आढाव, शंकर कडू, संदीप आमले, सुभाष लोढा, प्रसाद आढाव, सतीश रानोडे, राहुल नरोडे, साईनाथ नरोडे, युवराज सोनवणे, हर्षल जोशी, शुभम नरोडे, दत्तात्रय कोळपकर, सिद्धार्थ साठे, रोहित कनगरे, सागर राऊत, वैभव सोळसे आदींसह यात्रा उत्सव समितीचे पदाधिकारी, सदस्य व भाविक-भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोपरगाव टिळकनगर येथे जय लक्ष्मी आई यात्रा निमित्ताने सोनु साठे यांचा संगीत भक्ती गीतांचा कार्यक्रम संपन्न. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक दाबा
कोपरगावात महाराष्ट्राचे प्रसिध्द गायक अनिरुध्द वनकर यांचा प्रबोधन गायनाचा कार्यक्रम संपन्न सविस्तर बातमीसाठी खालील लिंक दाबा, व कोपरगावातील बातम्यासाठी या चँनलला सबस्क्राईब करा


