ब्रेकिंग

स्मशानभूमीला मलमपट्टी केली सर्जरी कधी ?  जेऊर कुंभारी ग्रामपंचायतीचा कारभार

स्मशानभूमीला मलमपट्टी केली सर्जरी कधी ?  जेऊर कुंभारी ग्रामपंचायतीचा कारभार

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी गावातील गेल्या अनेक वर्षांपासून स्मशानभुमी दुरुस्ती व्हावी यासाठी ग्रामस्थांसह शिवसुञ युवा प्रतिष्ठाण ने वेळोवेळी मागणी करुन देखील दखल न घेतल्याने ग्रामपंचायत कर्मचारीसह सदस्यांना धारेवर धरताच जनतेच्या समाधानासाठी मलमपट्टी केली. केलेले कामकाज हे तात्पुरते केले असुन स्माशनभुमीची सर्जरी कधी करणार अशी विचारणा शिवसुञ युवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष विशाल गुरसळ यांनी केली आहे.जेऊर कुंभारी हे लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे गांव आहे. जसे गांव आहेत तसे सुविधा महत्त्वाचे असतात तेच मिळत नसेल तर उपयोग तरी काय ?. ग्रामपंचायतीचे सोय सुविधा उपलब्ध करुन देण्याची जवाबदारी असुन देखील  ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या प्रश्नाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास येताच शिवसुञ युवा प्रतिष्ठाण चे पदाधिकारी यांनी वेळोवेळी निवेदन देवुन ही प्रश्न सुटत नसल्याने प्रतिष्ठाणने आक्रमक भुमिका घेताच ग्रामपंचायतने हालचाल सुरु केली. स्मशानभुमीसह पिंजऱ्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली ती दुरुस्तीची मागणीचा जोर वाढताच ग्रामपंचायतीने जनतेच्या समाधानासाठी मलमपट्टी केली असल्याचे जनतेच्या निदर्शनास येताच प्रतिष्ठाणने व ग्रामस्थांनी ग्रामपंचायतने धारेवर धरले केलेल्या कामकाजाची माहिती देतांनाही देखील चुकीचे व उडवाउडवी उत्तरे दिली काम कोणी केले हेच ग्रामपंचायत सांगू शकत नाही किती मोठी शोकांतिका आहेत. ग्रामपंचायतीचा कारभार ग्रामपंचायतीने न बघता सर्व  काराभार ग्रामसेवकांच्या हातात का ?. निकृष्ट दर्जाचे काम तातडीने बंद करा अन्यथा मोठे अंदोलन उभे केले जाईल असा इशारा देखील शिवसुञ युवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष विशाल गुरसळ यांनी दिला आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे