७.५ कोटी निधीच्या शेत पाणंद रस्त्यांच्या कामाला प्रशासकीय मान्यता-आ. आशुतोष काळे

७.५ कोटी निधीच्या शेत पाणंद रस्त्यांच्या कामाला प्रशासकीय मान्यता-आ. आशुतोष काळे
कोपरगाव वार्ताहर – मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजनेतून बारमाही, मजबूत रस्त्यांचे बांधकाम करून पेरणी, मशागत,कापणी आणि शेतमाल वाहतुकीस गती देण्यासाठी कोपरगाव मतदार संघातील शेतकऱ्यांच्या रस्त्याच्या अडचणी सोडविण्यासाठी निधी मिळावा यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी महायुती शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव मतदार संघातील ७.५ कोटी निधीच्या शेत पाणंद रस्त्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.

ग्रामीण भागातील नागरीकांना शेत,पाणंद रस्त्यांची वाढती गरज लक्षात घेवून व शेतकऱ्यांना ये

पावसाळ्यात चिखल व साचलेल्या पाण्यामुळे रस्ते बंद राहतात त्यामुळे बैलगाडी, ट्रॅक्टर देखील शेतात जावू शकत नाही. पेरणी आणि कापणीच्या वेळी जर अशी परिस्थिती असेल तर शेतकऱ्यांच्या अडचणीत अधिकच वाढतात. याची दखल घेवून महायुती शासनाने शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजना सुरु केली आहे. पाणंद रस्त्यांमुळे शेतकऱ्यांना शेतात सुलभपणे ये-जा करता येणार आहे. तसेच पेरणी आणि काढणीच्या हंगामात शेती मालाची वाहतूक अडचण कमी होवून शेतमाल बाजारात पोहचवण्यासाठीचा खर्च निश्चितपणे कमी होणार असून तातडीने बाजारपेठेशी संपर्क होण्यास मोठी मदत होणार आहे. चिखल,पावसाळा किंवा खराब रस्त्यांच्या समस्यांपासून शेतकऱ्यांची का



