कृषीवार्ता

वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची बिपीनदादा कोल्हे यांनी केली पाहणी

वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची बिपीनदादा कोल्हे यांनी केली पाहणी

कोपरगाव तालुक्यात नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्यामुळे धामोरी, रवंदा, ब्राह्मणगाव, टाकळी व परिसरातील अनेक ठिकाणी नुकसान झाले.यासह अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केली. या नुकसानीची पाहणी करून त्यांनी नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडून गेले असून झाडे उन्मळून पडल्याने तसेच कांदाचाळी, शेती पूरक व्यवसायांचेही मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः धामोरी येथील नर्सरीचे, कांदा चाळींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणी भेट देऊन बिपीनदादा कोल्हे यांनी नुकसानीची माहिती घेत संबंधितांना धीर दिला.

यावेळी त्यांनी प्रशासनाने तातडीने नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करून शासनाकडून काही मदत मिळण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करावे, अशी सूचना केली.नागरिकांना दिलासा मिळावा आणि त्यांचे नुकसान भरून निघण्यासाठी हातभार लागावा यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आलेल्या नागरिकांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे आहोत, असा विश्वास बिपीनदादा कोल्हे यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच शासन व प्रशासनाने समन्वय साधून नुकसानग्रस्तांना दिलासा देण्यासाठी आ.विवेकभैय्या कोल्हे यांनीही सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे प्रशासनाने अहवाल शासनाला सादर करावा.या पाहणी दौऱ्यामुळे नुकसानग्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला असून त्यांच्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे