ग्रामसेवक हा ग्राम व्यवस्थेचा कणा असतो – अरुण नाथ गिरीजी महाराज

ग्रामसेवक हा ग्राम व्यवस्थेचा कणा असतो – अरुण नाथ गिरीजी महाराज –
संपादक:- रवींद्र जगताप
कोपरगाव – ग्रामसेवक हा ग्राम व्यवस्थेचा कणा असतो, गावाचा विकास करण्यासाठी, शासकीय योजना राबविण्यासाठी ग्रामसेवक महत्वाचे कार्य करतात, गाव आणि शासनाच्या मधला दुवा ग्रामसेवक आहे असे विचार श्रीरामपूर तालुक्यातील श्री क्षेत्र भामाठाण येथील अडबंगनाथ देवस्थानचे श्री अरुणनाथ गिरीजी महाराज यांनी व्यक्त केले.कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपुर, करंजी येथील ग्रामसेवक सुनील राजपूत यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाला त्या निमित्ताने चंद्रमा कलर फोटोचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र काशिनाथ भवर, वृत्तपत्र छायाचित्रकार साहित्यिक हेमचंद्र भवर यांनी सत्कार समारंभाचे आयोजन केले होते.स्वागत व प्रास्ताविक हेमचंद्र भवर यांनी केले. या प्रसंगी भामाठाण येथील अडबंगनाथ देवस्थानचे अध्यक्ष अरुण नाथ गिरीजी महाराज यांनी आपले मनोगत व्यक्त केले गाव ग्रामस्थ ग्रामपंचायत आणि शासन यंत्रणा यांच महत्व विशद केले.सुनील राजपूत यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले त्यावेळी राजेंद्र काशिनाथ भवर हेमचंद्र भवर, कर्मवीर शंकरराव कोल्हे सह साखर उद्योग समूहातील पवार साहेब, भवर फिश होमचे कुणाल भवर, सौ. तेजश्री भवर, सौ. मंगल हेमचंद्र भवर आदि उपस्थित होते.राजेंद्र भवर यांच्या हस्ते महाराजांचा सन्मान करण्यात आला कुणाल भवर यांनी आभार प्रदर्शन केले.





