पाणी योजनेला आडवे येण्याचे पाप कुठे फेडणार- संदीप वर्पे
पाणी योजनेला आडवे येण्याचे पाप कुठे फेडणार- संदीप वर्पे
कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव शहराचा बिकट झालेला पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द पूर्ण करून आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या मदतीने ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १३१.२४ कोटी निधी मिळविला आहे.त्याचबरोबर वाढीव पाणी देखील मंजूर करून घेतले.मात्र या अत्यंत महत्वाच्या पाणी योजनेला विरोधक अप्रत्यक्षपणे न्यायालयीन आडकाठी आणण्याचे पाप करीत असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट करून पाणी योजनेला आडवे येण्याचे पाप कुठे फेडणार? असा प्रश्न कोल्हे यांचे नाव न घेता राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे.ना.आशुतोष काळेंच्या भगीरथ प्रयत्नांना मिळालेल्या यशातून ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १३१.२४ कोटी रुपयांची प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. तसेच ५ नंबर साठवन तलाव मोठा असल्यामुळे या साठवण तलावासाठी वाढीव पाणी आरक्षित करण्यासाठी शासनाकडून मंजुरी मिळविली आहे.मात्र विरोधक पडद्या मागून शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवण्याचे पाप करीत असून न्यायालयाच्या माध्यमातून आडकाठी आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र न्यायालयाने विरोधकांचे हे मनसुबे उधळून लावत त्यांनी केलेली याचिका फेटाळली आहे.त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने गौतम बँकेच्या सभागृहात पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी संदीप वर्पे बोलत होते.यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की, कोपरगाव शहरातील नागरिकांचा पाणी प्रश्न मार्गी लागला असतांना विरोधक या पाणी योजनेला अडथळा आणत आहे. एकीकडे कळवळा दाखवायचा व दुसरीकडे कुटनिती वापरून आपल्या धारणगाव,ब्राम्हणगाव गावातील कार्यकर्त्याकरवी न्यायालयात पाच नंबर साठवण तलाव,प्रसिद्ध झालेली निविदा व मंजूर करण्यात आलेले वाढीव पाणी आरक्षण स्थगित करावे अशा आशयाची याचिका दाखल करायची असे असे दुटप्पी धोरण विरोधक घेत आहे. या धोरणाचा महाविकास आघाडीच्या वतीने निषेध करत असल्याचे संदीप वर्पे यांनी यावेळी सांगितले, विरोधक तोंडावर एक आणि मागे एक अशी दुटप्पी भूमिका घेऊन शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवत आहे. हे त्यांचे अघोरी पाप आहे. हे पाप कुठं फेडणार असा सवाल संदीप वर्पे यांनी उपस्थित केला आहे. विरोधकांच्या दुटप्पी भूमिकेचा बुरखा या निमित्ताने गळून पडला असून शहरातील नागरिकांना पाण्यापासून कोण वंचित ठेवत आहे याची नागरिकांना न्यायालयाने ही याचिका फेटाळल्यामुळे प्रचिती आली आहे. त्यामुळे विरोधकांना याचे प्रायश्चित शहरातील जनता दिल्याशिवाय राहणार नाही असे संदीप वर्पे यांनी यावेळी सांगितले. यावेळी अॅडव्होकेट विद्यासागर शिंदे यांनी न्यायालयीन बाजू मांडून माहिती दिली.

या पत्रकार परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे शहराध्यक्ष सुनील गंगूले माजी गटनेते नगरसेवक वीरेन बोरावके, मंदार पहाडे,युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तुषार पोटे, शिवसेनेचे भरत मोरे,प्रफुल्ल शिंगाडे,रमेश गवळी, कृष्णा आढाव, अॅडव्होकेट विद्यासागर शिंदे, राजेंद्र वाकचौरे, चंद्रशेखर म्हस्के, फकिर कुरेशी, राहुल देवळालीकर, वाल्मीक लहिरे, सलीम पठाण,संदीप कपिले,दिनकर खरे, प्रकाश दुशिंग आदी उपस्थित होते


