‘मन चंगा तो कठोती में गंगा’ संत रोहिदास महाराज यांच्या जयंती निमित्ताने घटनाकार मैत्री संघाच्या वतिने विनम्र अभिवादन
‘मन चंगा तो कठोती में गंगा’ संत रोहिदास महाराज यांच्या जयंती निमित्ताने घटनाकार मैत्री संघाच्या वतिने विनम्र अभिवादन
देशभरात संत रोहिदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असुन कोपरगाव शहरातील घटनाकार मैत्री संघाचे अध्यक्ष गौतमराव बनसोडे यांनी जयंती निमित्ताने अभिवादन करुन म्हणाले की,मन चांगले असेल तर गंगा आपल्याजवळच असेल या आशयाचा हिंदी वाक्प्रचारही त्यांच्याच दोह्यातून आला आहे. रोहितदासांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून समाजाला उपदेश केला. संत रोहिदासांच्या विचारांनी प्रेरीत होवून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘द अनटचेबल’ हा ग्रंथ संत रोहिदासांच्या चरणी अर्पण केला आहे.हिल,मिल चलो जगतमे, फूट पडो दो नही, फूट पडी माची तो, देश नष्ट हो जाई’ एकजुटीला संत रविदासांच्या दृष्टीकोनातून अनन्यसाधारण महत्व आहे. देशहितासाठी आपआपसात, समाजासमाजात तूट निर्माण होवू देवू नका असा अमुल्य संदेश त्यांनी दिला आहे.


