महाराष्ट्र

पाठपुरावा महत्त्वाचा:-नारायण राणुजी गवळी, सामाजिक कार्यकर्ता कोपरगांव.

पाठपुरावा महत्त्वाचा:-नारायण राणुजी गवळी, सामाजिक कार्यकर्ता कोपरगांव.
संपादक :- रविंद्र जगताप
 माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे हे गोर गरीब दुःखीतांचे अश्रु पुसण्यांत वाकबगार होते. त्यांच्या कार्यावर प्रभावीत होवुन आपणही सामाजिक कार्यात अग्रभागी राहिलो. चंद्रमामा लोणकर, भाउसाहेब शिंदे आदिंबरोबर माझी मैत्री होती. चंदुमामा लोणकर यांना येथील शेती पाणी प्रश्नाची तळमळ होती. त्यांच्याबरोबर आपण अनेकवेळा मुंबईत गेलो., पुढे माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या पाटपाणी संघर्षात काम केले.   लक्ष्मीनगरचे माझे मित्र नगरसेवक सुनिल लोखंडे सतत गोर गरीबांचे प्रश्न घेवुन यायचे. दररोज सकाळी वर्तमानपत्र वाचणे हा आपला नित्याचा छंद असल्याने त्यातुन केंद्र, राज्य शासनांत तसेच अहमदनगर जिल्हयात कोण कोण व्यक्ती कार्यरत आहेत याची माहिती मिळते त्याचा संग्रह करण्याचा माझा छंद आहे.   सुनिल लोखंडेंनी लक्ष्मीनगर भागात गरीबांसाठी अद्यावत दवाखाना व्हावा अशी कल्पना माजीमंत्री शंकरराव कोल्हेंसमोर मांडली कोपरगांव ग्रामिण रूग्णालयाचा पाठपुरावा सुरू झाला. त्याबाबत शंकरराव कोल्हे व बिपीनदादांनी खुप पाठपुरावा केला. मला आठवतं शासनांत इप्पेवर आरोग्य खात्याचे सचिव होते. त्यांच्याशी कोल्हे साहेबांमार्फत सातत्यांने फोन केले.  कोल्हे साहेबांचे मित्र दिग्वीजय खानविलकर आरोग्यमंत्री होते प्राधान्यांने कोपरगांव ग्रामीण रूग्णालयाचे काम मंजुर करून आणले त्यासाठी अर्थसंकल्पात आर्थीक तरतुदही केली. आज दिमाखात कोपरगांव ग्रामिण रूग्णालय उभं आहे हीच शंकरराव कोल्हे यांच्या कार्याप्रती श्रध्दांजली होय.
मनुष्याचा पाठपुरावा जर असेल तर अशक्य गोष्टही शक्य होते हे लक्ष्मीनगर कोपरगांव ग्रामिण रूग्णालयाचे जीवंत उदाहरण आहे. शहरासाठी ४२ कोटी रूपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनाही बिपीनदादा कोल्हे यांच्याच पाठपुराव्यामुळे मंजुर झाली आहे. आजकाल नेत्यांना काम सांगुन त्याचा पाठपुरावा न करणारे कार्यकर्ते खुप आहेत. आपल्या कामाचा पाठपुरावा आपणच केला तर त्याला मुर्त रूप नेते मंडळी आणू शकतात.
नारायण राणुजी गवळी, सामाजिक कार्यकर्ता कोपरगांव.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे