कृषीवार्ता

राजगिरा लाडू आणि चिक्कीलाही लागला महागाईचा चटका

येत्या दोन वर्षापासून कोरोना नंतर युक्रेन रशिया युद्धाचे परिणाम संपूर्ण जगावर पडले असून कच्च्या मालाचे पेट्रोल गॅस प्लास्टिक अशा अन्य जीवनावश्यक वस्तूंवर परिणाम पडला आहे यासंदर्भात कालांश राजगिरा लाडू चे युवा उद्योजक रोहित काले यांनी या वेळेस उत्पादन क्षेत्र कात्रीत सापडल्याचे सांगितले महागाईच्या फटका सर्व व्यापाऱ्यांना व ग्राहकांना झाला असून सर्व कंपन्यांनी आपापल्या पद्धती या महागाईचा सामना केला आहे अशा परिस्थितीत गेल्या दोन-तीन वर्षात राजगिरा चे भाव 40 ते 50 टक्क्यांनी वाढले आहे प्लास्टिक ने सुद्धा आपली मजल 60टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली आहे यादरम्यान गॅस ने सुद्धा 20 टक्के पर्यंत आपली हजेरी महागाईच्या लाटेत दिली आहे तसेच चिक्की साठी लागणारा शेंगदाणा सुद्धा या वर्षात 20 टक्क्याने वाढला आहे मात्र राजगिरा लाडू चिक्की शेंगदाणा चिक्की चे उत्पादन करणारी कंपनी ला घाऊक व्यापारी किरकोळ व्यापारी आणि ग्राहक त्यांना त्यांचा योग्य भाव देण्यास तयार होत नाही दोन वर्षांपूर्वी चे रेट आणि वजन आजही त्याच भावात उत्पादकांना देणे परवडत नसून उत्पादकांना वाढीव भावाचा चटका आणि खालून न मिळालेला योग्य भाव यांच्या कात्रीत तो सापडला आहे त्यात काम करणाऱ्या महिला सुद्धा या महागाईत त्यांची रोजची हजेरी वाढून घेतली आहे परंतु व्यापारी व ग्राहक या उत्पादन क्षेत्राला वाढीव पैसे देण्यास अजूनही तयार होत नसल्याने या कंपन्यांवर एक प्रकारचे संकट पडले आहे कालांश उद्योग चे उत्पादन सगळ्या घरात हा आवडीचा पदार्थ आहे लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत राजगिरा लाडू शेंगदाणा चिक्की अशा गोड युक्त पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेतात व आपल्या प्रियजनांना देतात

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे