ब्रेकिंगमहाराष्ट्र

विश्वावर आलेले कोरोनाचे संकट कायमचे जावो ना. आशुतोष काळेंची महेश्वर चरणी पार्थना

महेश्वर यात्रेनिमित्त काढण्यात आलेल्या कावड यात्रेत ना. आशुतोष काळे खांद्यावर कावड घेवून सहभागी झाले

विश्वावर आलेले कोरोनाचे संकट कायमचे जावो ना. आशुतोष काळेंची महेश्वर चरणी पार्थना

कोपरगाव प्रतिनिधी– मागील दोन वर्षापासून संपूर्ण विश्वावर जीवघेणे कोरोना संकट आले. त्यामुळे मागील दोन वर्षापासून सर्व यात्रा उत्सवावर बंदी होती. या जीवघेण्या कोरोना संकटाच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेने प्रत्येकाच्या नात्यातील जवळच्या व्यक्तींना कायमचे हिरावून घेतले आहे. या कोरोनाच्या संकटाचा प्रत्येक घटकाला फटका बसला आहे. परंतु नागरिकांनी घेतलेली योग्य काळजी, केलेले सहकार्य व मोठ्या प्रमाणावर झालेले लसीकरण त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला यशस्वीपणे परतावून लावत राज्य सरकारने गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील जनतेला दोन वर्षापूर्वी घातलेल्या निर्बंधांपसून निर्बंधमुक्त केले आहे. भविष्यात देखील नागरिकांचे आरोग्य अबाधित रहावे यासाठी संपूर्ण विश्वावर आलेले कोरोनाचे संकट कायमचे जावो अशी प्रार्थना श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी कोळपेवाडी व पंचक्रोशीतील नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या महेश्वर चरणी केली.

कोळपेवाडी येथील प्रसिद्ध महेश्वर यात्रेला दोन वर्षाच्या कालखंडानंतर शनिवार (दि.०२) पासून चैत्र शुद्ध गुढीपाडव्यापासून प्रारंभ झाला. यावेळी ना. आशुतोष काळे यांनी महेश्वराचे मनोभावे दर्शन घेवून पार्थना केली. तसेच यात्रेच्या नियोजनाबाबत कोळपेवाडी ग्रामस्थ व यात्रा कमिटीशी चर्चा करून माहिती घेतली. यावेळी काढण्यात आलेल्या कावड मिरवणुकीत ना. आशुतोष काळे यांनी कावड खांद्यावर घेवून कावड मिरवणुकीत सहभाग घेतला. याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा कोळपेवाडीचे लोकनियुक्त सरपंच सूर्यभान कोळपे, उपसरपंच डॉ. प्रकाश कोळपे,वसंतराव कोळपे, गोरक्षनाथ कोळपे, ज्ञानेश्वर कोळपे,जनार्दन कोळपे, राजू कोळपे, सुंदर कोळपे, सागर कोळपे, विक्रम कोळपे, विलास कोळपे, महेश कोळपे आदींसह ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे