ब्रेकिंग

भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांचे येसगांव निवासस्थानी हर घर तिरंगा अभियान

भारतीय स्वातंत्राच्या अमृत महोत्सवानिमीत्त हर घर तिरंगा अभियानात भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई व बिपीनदादा शंकरराव कोल्हे यांनी येसगांव निवासस्थानी तिरंगा ध्वज फडकवत त्यास मानवंदना दिली. याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यांचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे, सौ. रेणुका कोल्हे हजर होते

भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांचे येसगांव निवासस्थानी हर घर तिरंगा अभियान

संपादक – रविंद्र जगताप
कोपरगांव :- कोपरगांव विधानसभा मतदार संघाच्या प्रथम महिला आमदार, भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी येसगांव निवासस्थानी हर घर तिरंगा अभियानात तिरंगा ध्वजास मानवंदना देत भारतीय स्वातंत्राचा अमृत महोत्सव साजरा केला. याप्रसंगी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे, सौ. रेणुका विवेकभैय्या कोल्हे उपस्थित होत्या.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय जे. पी. नड्डा यांनी देशात सर्वत्र भारतीय स्वातंत्राचा अमृत महोत्सव हर घर तिरंगा अभियानाने साजरा करण्याचे आवाहन केले होते त्यास कोपरगांव शहरासह संपुर्ण विधानसभा मतदार संघात नागरिकांचा मोठा प्रतिसाद असुन १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान हे अभियान राबविले जात आहे.
सौ. स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे म्हणाल्या की, भारत देशाला स्वातंत्र मिळुन ७५ वर्षे पुर्ण झाले. ही घटना संपुर्ण जगतात प्रकर्षाने सर्वांच्या स्मरणात रहावी त्यासाठी भारतात ” हर घर तिरंगा अभियान होत आहे. यातुन स्वातंत्राच्या चेतना आणि देशाबददलच्या अभिमानाची जाणिव होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी व सर्व केंद्रीय मंत्री मंडळाने भारत देशाच्या एकता अखंडतेसाठी आजवर विशेष उल्लेखनीय योगदान देत आहेत, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सर्व मंत्री मंडळाने देखील राज्यात हर घर तिरंगा अभियान एक उत्सव म्हणुन साजरा होण्यासाठी जिल्हा तालुका स्तरावर त्याचप्रमाणे ग्रामिण भागापर्यंत विशेष काळजी घेत असुन संपुर्ण प्रशासकीय यंत्रणा, नागरिक, देशबांधव, स्वातंत्रसेनानी या अमृत महोत्सवी उत्सवात सहभाग देत असुन देशभक्तीपर गीत आणि तिरंगा ध्वजाची शान वाढवून स्वातंत्र्य जागर आठवणींना उजाळा देत आहे असेही सौ. स्नेहलता कोल्हे शेवटी म्हणाल्या

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे