आयुष्यमान( प्रधानमंत्री जनआरोग्य) योजनेचा फेर सर्वे व्हावा !!- सुधाकर वक्ते
आयुष्यमान( प्रधानमंत्री जनआरोग्य) योजनेचा फेर सर्वे व्हावा !!- सुधाकर वक्ते
कोपरगाव प्रतिनिधी:-देशातील गोर-गरिब जनतेला मोफत उपचार देण्यासाठी भारत सरकार प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना राबवत आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी सन २०११च्या जनगणनेनुसार सर्वे करण्यात आला होता परंतु या सर्व मध्ये त्रुटी आढळून येत असुन हा सर्वे अन्यायकारक झाल्याचे मत भाजपा युवा युवामोर्चा चे सुधाकर वक्ते यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात व्यक्त केले आहे.गरीब आणि मागासलेल्या तसेच दारीद्र रेषेखालील लोकांना आरोग्य विमा संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना (Ayushman Bharat Yojana) एक महत्त्वाकांक्षी योजना राबविली आहे. त्याचा २०११ सर्वे करण्यात आला होता परंतु आजमितीला ग्रामिण भागातील बहुतेक गरजु लाभार्थी वंचित असल्याचे दिसुन येत आहे

आजही देशात अशा लोकांची संख्या खूप जास्त आहे,ज्यांना गरिबीमुळे हॉस्पिटलमधील महागड्या उपचारांचा खर्च परवडत नाही.अशा परिस्थितीत जेव्हा त्यांना कोणत्याही प्रकारच्या आरोग्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. त्या काळात आर्थिक विवंचनेमुळे त्यांच्यासमोर संकटांचा डोंगर कोसळतो. तेव्हा आयुष्मान जनआरोग्य कार्ड उपयोगी येते आज २०११ च्या जनगणनेनुसार समाविष्ट यादीप्रमाणे नागरिकांना आयुष्यमान कार्ड दिले जात आहे तेव्हा त्याचा फेर सर्वे करण्यात यावा अशी मागणी भाजपा युवा मोर्चा सुधाकर वक्ते यांनी केली आहे.



