मणिपूर येथील आदिवासी महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शासन करा :-अमित आगलावे
मणिपूर येथील आदिवासी महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शासन करा :-अमित आगलावे
जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य आदिवासी महादेव कोळी युवा संघटना जिल्हा शाखा अहमदनगर.
कोपरगाव:-तहसीलदार साहेब कोपरगाव यांना निवेदन देण्यात आले यामध्ये मणिपुर राज्यातील थोबल जिल्हातील आदिवाशी दोन महिलांना नग्न करुन त्यांची धिंड काढुन सामुहिक बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशी देण्यात यावी. तसेच मणिपूर राज्यांमध्ये गेल्या अनेक दिवसापासून आदिवासी समाजावर अन्याय अत्याचार चालू आहे. तसेच केंद्र सरकार व राज्य सरकार या घटनेची कुठलीही दखल घेताना दिसत नाही. या सर्व बाबीचा आमचे संघटना तीव्र निषेध व्यक्त करीत आहेत तसेच आमच्या संघटनेच्या वतीने शासनास नम्र विनंती आहे. देशभरातील आदिवासी बांधवांच्या मणिपूर घटनेवरून भावना तीव्र आहे. आपण आमच्या निवेदनाची दखल घेऊन लवकरच कारवाई करावी नाहीतर अन्यथा आम्हालाही रस्त्यावर उतरावे लागेल . अशी मागणी या निवेदनाद्वारे अमित आगलावे यांनी केलीआहे. या निवेदनात पुढे म्हटले आहे की, आजपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेल्या घटनेचे व्हिडिओ अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत आहे. याची सर्व चौकशी झाली पाहिजे. सदरील व्हिडिओ खोटे आहे का खरे आहे? याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे. तसेच केंद्र आणि राज्य सरकार आदिवासी समाजाला संपायला निघालेला आहे ‘असं दिसू लागला आहे पण त्यांना अजून माहिती नाही का? हा आदिवासी समाज या भारताचा मूळ मालक आहे. मूळ मालकांना संपवून टाकण्याचा हा मनसुबा कधीच पूर्ण होणार नाही. तेव्हा आमच्या निवेदनाची दखल घेऊन आपण मणिपूर राज्यांमध्ये आदिवासी बांधवांवर होणारे अन्यायावर त्वरित प्रतिबंध करून आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी.

आम्ही सर्व आदिवाशी बांधव आपणाकडे या निवेदनाद्वारे मागणीकरीत आहे. तसेच हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात देण्यात यावा यासाठी आपणाकडे ही विनंती करीत आहे. तरी अशी घटना परत होऊ नये साठी अशा नराधमांना कडक शासन होणे गरजेचे आहे. तरी आमचे निवेदन सरकार कडे सादर करून त्वरित कारवाई करण्यास नम्र विनंती करीत आहोत निवेदन देण्याच्या प्रसंगी समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. शरद भाऊ खरात वंचित बहुजन आघाडीचे महिला कार्यकर्त्या पदाधिकारी उपस्थित होते



