सामाजिक

गंगा दशहरा निमित्ताने कोपरगांवात गंगा-गोदावरी पुजन…

गंगा दशहरा निमित्ताने कोपरगांवात गंगा-गोदावरी पुजन…

कोपरगांव येथील श्रीमंत महामहीम पवार सरकार संस्थानचे सोमेश्वर महादेव देवस्थान वतीने गंगा दशहरा निमित्ताने कोपरगांवातील गोदातीरावर गंगा-गोदावरी पुजन संत रामदासी बाबा भक्त परिवाराचे सौ. शोभादेवी आणि श्री शरदनाना थोरात या उभयतांच्या शुभहस्ते जेष्ठ शुध्द दशमी शके १९४७ तिथीनुसार गंगा दशहरा साजरा करण्यात आला आहे.प्रभु श्रीराम यांचे पुर्वज राजा सगर यांचे पुत्रांना कपिल मुनींच्या शापातून मुक्तीसाठी भागिरथाने घोर तपश्चर्या केली. ब्रम्हदेव आणि शिवशंकर यांनी भागिरथाला प्रसन्न होवुन जेष्ठ शुध्द दशमीला हस्त नक्षत्रात गंगा पृथ्वीवर अवतरली होती. गंगाजलाने राजा सगर यांचे पुत्रांना मुक्ती मिळाली. म्हणून गंगाजल, गंगा स्नानाला विशेष महत्त्व आहे.सोमेश्वर महादेव देवस्थानचे वतीने वार्षिक सण- उत्सवात “गंगा दशहरा” उत्सव दरवर्षी साजरा केला जातो. याही वर्षी सोमेश्वर महादेव शिवमुखावर गंगा-गोदावरी जलाभिषेक गोदातीरावर करण्यात आला. त्यानंतर पुजा करुन शिवमुखाची शंखनाद सवाद्य मिरवणूक गांवठाणातून संपन्न झाली. गंगा-गोदावरी ओटी भरणे, संकल्प अभिषेक आणि सोमेश्वर शिवलिंगावर आंबा फळ सजावट करण्यात आली होती.गंगा दशहरा निमित्ताने जेष्ठ प्रतिपदा ते दशमी पर्यंत सलग दहा दिवस सकाळी सोमेश्वर शिवलिंगावर काशी जलाभिषेक पुजा करण्यात आली होती. पौरोहित्य प्रदिपशास्री पदे, प्रशांत स्वामी जंगम, नंदू शेंडे गुरव यांनी केले आहे. सोमेश्वर महादेव शिवलिंग आंबा फळ, बेल आणि विविध फुलांनी सजविण्यात आले…सोमेश्वर महादेव देवस्थानचे प्रमुख महेंद्र पाटील यांचे मार्गदर्शनानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी सुशांत घोडके यांनी यजमान यांचे टोपी, उपरणे, श्रीफळ आणि प्रसाद देवून स्वागत केले…

गंगा गोदावरी माता की जय…
हर हर महादेव…
जय सोमेश्वर…

 

गंगा दशहरा पौराणिक माहिती…*
जेष्ठ शुध्द दशमीला हस्त नक्षत्रात गंगा पृथ्वीवर अवतरली… तीच्या उगम स्थानापासून प्रवाहीत मार्गावरील भूतलावरच्या जीवसृष्टीचे कल्याण झाले आहे… गंगेच्या अवतरण्याची पौराणिक महती आहे.भगवान राम यांचे पूर्वज “राजा सगर” यांनी अश्वमेध यज्ञ केला. या यज्ञातील घोडा राजा इंद्राने चोरुन कपिल मुनी यांचे पाताळातील आश्रमात बांधला. या वेळी कपिल मुनी तपस्येत होते. राजा सगर व त्यांच्या पुत्रांनी घोड्याचा शोध घेतांना कपिल मुनींच्या आश्रमात पोहोचले. तेव्हा तेथे बांधलेला घोडा पाहून कपिल मुर्तीनी आपला घोडा चोरला असावा… या भावनेतून राजा व त्याचा पुत्रांनी त्यांचेवर आक्रमण केले… मुनींच्या तपस्येत भंग झाला. मुनींनी डोळे उघडताच आक्रमण केलेल्या राजाच्या पुत्रांना, सैनिकांना भस्म करण्यास सुरुवात केली… यातून राजा सगर व पुत्र अंशुमान आपला बचाव करत मुनींना शरण गेले. मुनींची क्षमा याचना करु लागले, मुनींच्या प्रकोपाने मृतांना मुक्ती आणि शांती मागितली… क्रोधित मुनींनी क्रोधावर संयम आणला… राजाच्या इच्छेनुसार कपिल मुनीनी त्यांचेवर “गंगाजल” शिंपडून मुक्ती देता येईल असे सांगितले.राजा सगर यांचा पुत्र अंशुमान यांनी तपस्या करून देवी गंगेला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न असफल ठरला. पुढे अंशुमानचा पुत्र राजा दिलीप यांनी तपस्या करून देवी गंगेला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला. या सर्वांनी प्रयत्नात असफल होवून शेवटी प्राण सोडले… पुढे राजा दिलीप यांचा पुत्र राजा भागिरथ यांचे घोर तपस्येला ब्रम्हदेव प्रसन्न झाले. त्यांनी ब्रम्हदेवाला गंगा मातेला भूतलावर पाठविण्याचे वरदान मागितले. तेव्हा ब्रम्हदेवाने गंगेच्या प्रलयाचा भार आणि वेग सांभाळण्याची शक्ती फक्त शिवशंकरात असल्याचे सांगितले… तेव्हा भागिरथाने शिवाची कठिण तपस्या करुन त्यांनाही प्रसन्न केले… भगीरथाच्या तपस्येचे फलित म्हणून ब्रम्हदेवाच्या कमंडलूतून गंगा स्वर्गातून भूतलावर अवतरली…भगवान शिवशंकराने वेगाने आलेल्या गंगेला आपल्या जटांमध्ये सामावून घेतले… अशा प्रकारे “गंगा” स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली… ती तिथी म्हणजे हस्त नक्षत्रातील जेष्ठ शुध्द दशमी होय. गंगेचा उगम हा गंगोत्री या हिमनदीतून होतो. गंगेच्या मुख्य दोन नद्या आहेत भागीरथी आणि अलकनंदा… जेव्हा भागीरथी नदी १७५ किमीचा प्रवास पूर्ण करते त्यावेळेस अलकनंदा तिला मिळते आणि त्यापुढे ती गंगा या नावाने ओळखली जाते अलकनंदा ही नदी ज्या ठिकाणी भागीरथी या नदीला मिळते त्या ठिकाणाला देवप्रयाग म्हणतात. आपल्या मृत पूर्वजांना (सगरांच्या पुत्रांना) मुक्ती मिळवून देण्यासाठी भगीरथाने महलायासाने गंगेला पृथ्वीवर आणले. असे आजही मानले जाते. त्यामुळे पराकाष्ठेच्या प्रयत्नांना भगीरथ प्रयत्न म्हणतात. गंगा नदी ही दक्षिण आशियातील भारत व बांगलादेश या दोन देशातून वाहणारी एक महत्त्वाची नदी आहे. गंगेची लांबी २,५२५ कि.मी. आहे.भारतीय परंपरा आणि हिंदू धर्मात गंगा नदीला अतिशय पवित्र मानले आहे. तिला “माला” म्हटले गेले आहे. गंगा नदी ही लक्षावधी भारतीयांची जीवनदायिनी आहे. भारतातील कनोज, कोलकत्ता, कापिल्य, काशी, कौशांबी, पाटलीपुत्र (पाटणा), प्रयाग, बेहरामपूर, मुंगेर, मुर्शिदाबाद, इत्यादी प्राचीन, ऐतिहासिक व आधुनिक नगरे गंगेच्या किनारी वसली आहेत. भारतीय परंपरेत माणवाचे मुक्तीसाठी “गंगाजल” दिले जाते… भारत सरकारचे टपाल विभागामार्फत गंगोत्री (काशी) चे “गंगाजल” सेवा उपलब्ध करुन दिली आहे…

जाहिरात

याच गंगा मातेची थोरली बहीण म्हणजे गोदावरी गोहत्येचा पातकातून मुक्ती देणारी पापक्षालन करणारी नदी… गोदावरी कोपरगाव येथून वाहते… या स्थानाला दक्षिण काशी म्हणून विशेष महत्त्व आहे… या मुळे येथे राजे-महाराजे, पेशवा, संत-महंत यांचे वाडे, मठ, आश्रम गोदातटावर दिसतात… गंगा-गोदावरी नदीच्या पवित्रतेची महती सर्वदूर पोहचली आहे. गंगा दशहरा कालखंडात (जेष्ठ शुल्क १ ते जेष्ठ शुल्क दशमी) या कालखंडात गंगामाता पुजन, गंगा-गोदाजल याने शिवलिंगावर अभिषेक, पुजा, तसेच आंबा हे फळ महादेवाला अर्पणा करतात… तसेच महादेवाचे सेवेतील पुजारी (ब्राह्मण, जंगम, गुरव यासह अन्य कुठल्याही जाती धर्माचा शिवाच्या उपासनेतील सेवेकरी…) फळ दान केले जाते. सोमेश्वर महादेव देवस्थान कोपरगांव वतीने दरवर्षी गंगा दशहरा विधी धार्मिक पद्धतीने साजरा केला जातो.

या वर्षीही जेष्ठ शुक्ल १ ते जेष्ठ शुक्ल दशमी शके १९४७ (मंगळवार दि. २७ मे २०२५ ते गुरुवार दि. ५ जून २०२५) या कालावधीत सोमेश्वर महादेव देवस्थान येथे सकाळी १:०० ते १०:०० या वेळेत संपन्न झाले आहे. कुठल्याही प्रामाणिक आणि पराकष्ठेच्या प्रयत्नानांना भागिरथासारखे यश असतेच. गंगा दशहरा उत्सवाची धार्मिक परंपरा आपणही जपायला हवी, तसे आपण नेहमी म्हणतोच…”गंगा गोदावरी माता की जय!”

संकलन : सुशांत घोडके
सदस्य – गोदातीर परिसर इतिहास संशोधन मंडळ

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे