कृषीवार्ता

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उन्नतीसाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार – ना.आशुतोष काळे

कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात सुरु करण्यात आलेल्या आर.ओ.वॉटर फिल्टर प्लँट व वॉटर कुलरचे उदघाटन करतांना ना. आशुतोष काळे

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उन्नतीसाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार – ना.आशुतोष काळे

संपादक :- रविंद्र जगताप

कोपरगाव प्रतिनिधी  :- बाजार समितीची जास्तीत जास्त भरभराट कशी होईल यासाठी माझे सर्वोतोपरी सहकार्य राहील. कृषी उत्पन्न बाजार समितीची प्रगती झाल्यास तालुक्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक खर्च कमी होवून शेतकऱ्यांचे हित साधले जाणार आहे. व्यापाऱ्यांची व्यवसाय वृद्धी होवून बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे व त्याचा फायदा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे कोपरगावची बाजारपेठ फुलण्यास होणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती हि कृषी अर्थव्यवस्थेचा कणा असून कृषी उत्पन्न बाजार समितीची भरभराट होणे हे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्कर्षासाठी गरजेचे आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीला येणाऱ्या अडचणी सोडवून सर्वोतोपरी मदत करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करीन अशी ग्वाही देत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उन्नतीसाठी सहकार्य करणार असे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी केले आहे.कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात सुरु करण्यात आलेल्या आर.ओ.वॉटर फिल्टर प्लँट व वॉटर कुलरचे उदघाटन ना. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, अतिशय प्रतिकूल परिस्थितीत संचालक मंडळाने व प्रशासनाने योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यामुळे आज कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती राहाता, श्रीरामपूर, येवला बाजार समितींच्या पुढे गेली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व अडचणी सोडविण्यासाठी मी बांधील आहे. जनावरांच्या बाजाराच्या माध्यमातून बाजार समितीचे उत्पन्न वाढू शकते त्यासाठी देखील काही निर्णय घेण्याची गरज आहे. तसेच चमडा मार्केट व भाजीपाला शेडची वाढ करून सोयी सुविधा निर्माण करण्याची गरज आहे. महाविकास आघाडी सरकार असतांना तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या विकासासाठी शासनाकडून मदत देण्याबाबत योजना सुरु करण्याची घोषणा केली होती. सदरची योजना सुरु असल्यास त्या योजनेच्या माध्यमातून बाजार समितीसाठी निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहील अशी ग्वाही ना. आशुतोष काळे यांनी यावेळी दिली.

 यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक नामदेव ठोंबळ, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीपराव बोरनारे, संचालक शंकरराव चव्हाण, वसंतराव आभाळे, अनिल कदम, दिनार कुदळे, विष्णु शिंदे, बाजार समितीचे माजी सभापती मधुकर टेके, राजेंद्र निकोले, पं.स. माजी उपसभापती अर्जुनराव काळे, जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, अजितशेठ लोहाडे, एम.टी. रोहमारे, कांदा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग वक्ते, भुसार व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संतोष मुंदडा, डाळिंब व्यापारी संघटनेचे अध्यक्ष निकेत काळे, हमाल – मापाडी संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब शेळके, बाजार समितीचे सचिव नानासाहेब रणशुर, मा. नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, रमेश गवळी, कृष्णा आढाव, हाजी मेहमूद सय्यद, अजीज शेख, राजेंद्र वाकचौरे, फकिर कुरेशी, प्रशांत वाबळे, संदीप कपिले, संतोष शेजवळ, योगेश वाणी, राजेंद्र सावतडकर, नितीन शिंदे, तुषार भगत, तुषार सरोदे, महेश उदावंत, संतोष बारसे, उत्तम नळे, दादाप्पा ठुपके, संदीप सावतडकर, व्यापारी राजेंद्र सांगळे, ऋषीकेश सांगळे, आप्पासाहेब सांगळे, अखिल समधडीया, सनी भन्साळी, महेंद्र ठक्कर, सुहास गायकवाड, बाबासाहेब खैरनार, दिपक गायकवाड, गनी बागवान, मोसीन खान, सचिन जाधव, स्वप्नील पवार, गणेश कोल्हे, आप्पासाहेब वक्ते, विनोद सांगळे, जगदीश भट्टड, सुनील कोठारी, मनिष शहा, सुनील गंगवाल, ललित धाडीवाल, संजय भट्टड, संतोष सांगळे आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे